Sunday, January 2, 2011

लिहायचे ते लिहून टाकू.......


आयुष्यभर आसवे गाळून थकलो
भाव मनाचे आता
थोडे कागदावर फेकू
लिहायचे ते लिहून टाकू.......

मनात साठला आहे चिखल
जशी वटवृक्षाखाली त्याची पानगळ
म्हटले जरा झाडलोट करून टाकू
लिहायचे ते लिहून टाकू.......

आयुष्यभर इतरांचेच ऐकत आलो
म्हटले जरा आता हळव्या मनाचे ऐकू
लिहायचे ते लिहून टाकू.......

अर्थ न कळले कधी गहिरे
कल्पनेचे ना कधी फुटले धुमारे
म्हटले थोडे शब्दज्ञान तरी पारखू
लिहायचे ते लिहून टाकू.......

मन म्हणाले मला
पहा काव्य नभांगणी भरली
कित्येक तेजःपुंज कवींची सभा
चल आपणही तिथे
थोडे मिणमिणते झळकू
लिहायचे ते लिहून टाकू.......


genius_pankaj

No comments:

Post a Comment